Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नीरा खोऱ्यातील चारही धरणांमध्ये १५ टक्के पाणीसाठा




फलटण चौफेर दि ३ जून २०२५ 

नीरा खोऱ्यातील प्रमुख चार धरणांमध्ये आज सकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ७.५३६ टीएमसी (१५.५९%) पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. यावर्षीचा साठा गेल्यावर्षी याच दिवशीच्या तुलनेत समाधानकारक असून गतवर्षी ४.८४७ टीएमसी म्हणजेच १०.११% इतकाच साठा होता.


धरणनिहाय साठा आणि पर्जन्यमान:

भाटघर धरणात आजपर्यंत २ मिमी पाऊस झाला असून सध्या १.६८० टीएमसी (७.१५%) पाणीसाठा आहे. इनफ्लो शून्य आहे.

निरा देवघर धरणात ५ मिमी पर्जन्यमान नोंदले गेले असून साठा १.१०० टीएमसी (९.३८%) इतका आहे.

वीर धरणात यंदा एकूण पाऊस शून्य असूनही ३.९५६ टीएमसी (४२.०५%) साठा आहे. नीरा डावा कालव्या मधून विसर्ग बंद असून नीरा उजवा कालव्यामधून  ७०२ क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे.


गुंजवणी धरणात सर्वाधिक ११ मिमी पावसाची नोंद झाली असून सध्या साठा ०.८०० टीएमसी (२१.४९%) आहे. इनफ्लो ०.०७ टीएमसी असून वीज निर्मिती सुरू नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

 चारही धरणांमध्ये मिळून ०.००७ टीएमसी इतकी पाण्याची आवक झाली आहे.नीरा खोऱ्यात पावसाची सध्या उशिराने सुरुवात होत असली तरी साठ्याची स्थिती समाधानकारक आहे. पुढील काही दिवसांत पावसाची तीव्रता वाढल्यास पाणीसाठ्यामध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.